दोन दिवस झालेल्या वादळ,गारासह पावसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान ; अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी -२९/०४/२५ दि.२७,२८/२५ रोजी सायंकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील भालेश्वर,अ-हेरनवरगांव,पिंपळगांव (भोसले)येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
या मुळे रस्त्यावर अनेक झाडे पडून काही तास वाहतूक ठप्प झाली . तसेच आलेल्या तुफानी वादळा मुळे उन्हाळी धान पिक भूई सपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे धान पीक निसर्गाने हिरावून नेले आणि त्यांचे कंबरडे मोडले.आंबे,चिक्कु व अनेक फळझाडांची पडझड झाल्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.