गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांकरीता 8 दिवसाच्या आत गोसीखुर्द धरणाचे पाणी उपलब्ध करून द्या. - काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी.
★ अन्यथा वैनगंगा नदी पात्रात ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह हे शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी सारख्या मोठ्या नदी आहे, त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तर कधी गोसिखुर्द धरणातील विसर्ग किंवा मेडीगट्टा धरनातील बँक वाटर मुळे जिल्ह्यात वारंवार पुरस्थिती निर्माण होते व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी नुकसान होत असते.
या त्रासाला कंटाळून व झालेल्या नुकसानीची भरपाई भरून काढण्यासाठी नदी काठावरील अनेक शेतकरी उन्हाळी पिक घेतात, मात्र गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकर्यांना आता शेती करायला अडचणीचा सामना करावा लागत आहे या सोबतच अनेक पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्याची अडचण येत आहे.
नदी काटावरील गावातील भूजल पातळी सुद्धा कमी झाल्याने अनेक गावकर्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्मान होत असून सदर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन 8 दिवसाच्या आत गोसीखुर्द धरणातील पाणी तातडीने सोडण्यात यावे व जिल्ह्यातील शेतकरी, गावकरी यांच्या पाण्याची अडचण दूर करण्यात याव्या अशीमागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
8 दिवसाच्या आत मागणी पूर्ण न झाल्यास गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने हजारो शेतकरी व नदी काठावरील गावकर्यांना घेऊन वैनगंगा नदी पात्रात ठीय्या आंदोलन करण्याचा इशाराही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.