शुल्लक कारणावरून चाकूने गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून भर दिवसा हत्या.

शुल्लक कारणावरून चाकूने गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून भर दिवसा हत्या.


एस.के.24 तास


गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलिस ठाणे जवळच असलेल्या  बिबी येथील रामनगर मधील शिवराज पांडुरंग जाधव वय,21 वर्ष या युवकाची शुल्लक कारणावरून चाकूने गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून भर दिवसा हत्या केल्याने एकच खळबळ उडाली.ही घटना गुरुवार दि.6/02/2025 ला दुपारी 12.30 वा.च्या दरम्यान घडली.


 आरोपी : - अविनाश राधाकृष्ण पिल्ले वय,30 वर्ष व आशिष राधाकृष्ण पिल्ले वय,24 वर्ष रा.रामनगर बिबी अशी आरोपीची नावे आहे. सविस्तर वृत्त असे की, घरगुती विषयावरून मृतक व आरोपींचा वाद झाला.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अविनाश पिल्ले ह्याने त्याच्या भावाच्या मदतीने शेजारी राहत असलेल्या शिवराज ची हत्या करून कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्याला फेकून दिले.

         
घटनेची माहिती मिळताच गडचांदूर येथील ठाणेदार शिवाजी कदम सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनेत संपूर्ण परिवार सहभागी असल्याचा आरोप उपस्थित वॉर्डवासीयांनी केला व संपूर्ण परिवाराला हत्या प्रकरणात आरोपी बनवण्याची मागणी केली. हत्या करतात अविनाश पिल्ले ह्याने पोलिसांना समर्पण केले असून दुसरा आरोपी व आई वडील पोलिसांच्या हाती लागले नाही.


आरोपीची पार्श्वभूमी आरोपींवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून वार्डात महिलांना धमकी देणे, चाकू दाखविणे, अश्लील शिवीगाळ करणे व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे असे अनेक आरोप आहे.त्यात आरोपीला त्याच्या आई - वडिलांचे सुद्धा सहकार्य असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांचा आहे.त्यामुळे संपूर्ण परिवाराला येथून स्थानबद्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !