लेख : - सुरेश कन्नमवार यांच्या लेखणीतून... !! वटपौर्णिमा !!

 


  लेख : - सुरेश कन्नमवार यांच्या लेखणीतून...


              !! वटपौर्णिमा !!

 

वटपोर्णिमा निमित्य सर्व महिलांना " एस.के.24 तास " न्युज चॅनल अँड यु ट्युब चॅनल परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा...


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


आज दिनांक,21/06/2024 शुक्रवार ला वटपौर्णिमा सपना " ही " अजून निवांत झोपलेली आहे.गेल्यावर्षी लग्ना नंतर दुसऱ्याच महिन्यात वटपौर्णिमा आली होती आणि यावेळी ती अंघोळ पाणी करून नवीन नऊवारी साडी नेसून,नाकात नथ,गळ्यात अंगभर दागिने,पायांत नवीन चाळ, बोटांत नवीन जोडवी घालून हातात आरतीचे ताट घेऊन घरा शेजारच्या महिला कडे डोळे लावून उभी होती.आज मात्र बेड वरून उठायची नाव घेत नव्हती.मी झोपेत तिच्या चेहऱ्यावर पसरलेले स्मित कौतुकाने बगत बसलो होतो. 

एवढ्यात बाहेरून घराजवळच्या महिला चा  आवाज आला." सपना "अगं तयार झालीस की नाही ? चल लवकर.अगं आज किती उशीर झाला बघ.” त्यांना काय माहिती आठ वाजले तरी सपना अजून पहाटे च्या साखर झोपेत आहे ते..! 


मी तिला हलवून उठवत म्हणालो, “ए सपना,ऊठ घराजवळ च्या महिला आल्या बघ तुझ्या.मी लवकर मरावं म्हणून वडाला फेऱ्या टाकायला जायचं आहे ना तुला ? ” माझ्या या  शब्दांनी ती पटकन ऊठली.आवाजात थोडासा लटका राग आणून ती म्हणाली, “ किती छान झोप लागली होती जी...! स्वप्नही किती छान पडलं होतं. सकाळी, सकाळी अभद्र बोलून माझ्या झोपेची आणि स्वप्नाची वाट लावलास बघ..!

“बाहेर पहा,तुझ्या मैत्रिणी नटून थटून वडाला पुजायला निघाल्यात. दारात येऊन तुझी वाट बघायला लागल्या आहेत.” ती पटकन बेडवरून उठत केस सावरत तरातरा बाहेर निघाली.मी तिच्या पाठोपाठ जाऊन काही अंतरावर थांबलो होतो.पुढे काय होतेय हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने वाट बगत होतो.


दरवाजात येऊन ती घराशेजारील महिलांना म्हणाली, तुम्ही जाऊन या गं.मी नाही येणार वड पुजायला.” महिला डोळे विस्फारून तिच्याकडे पाहू लागल्या.एकजण सरसावत पुढे येत म्हणाली, “ ए शाहाने,झोप गेली नाही का काय तुझी ? सपना,“अगं, खरंच मी येणार नाही.तुम्ही जाऊन या.”अगं, असं काय करतेस ? वर्षातून एकदाच येते ना वटपौर्णिमा ? नवऱ्यासाठी तू एक दिवस सुद्धा उपवास करू शकत नाहीस ?


सपना,अगं,खरंच या वर्षी पासून मी वटपौर्णिमाच नव्हे तर नवऱ्यासाठी आणि कुणाहीसाठी कसलाच उपवास करणार नाही.अगं,असं अचानक काय झालं तुला ? गेल्यावर्षी तर सर्वांच्या आधी तयार होऊन बसली होतीस ना..!


सपना,काही नाही गं.गेल्या वर्षी ही वटपौर्णिमेचा उपवास आणि वडाला फेऱ्या मारायला माझ्या नवऱ्याचा विरोध होतापण माझ्या हट्टापुढे त्याचं काय चाललं नाही.काय ? वटपौर्णिमे च्या उपवासाला तुझ्या नवऱ्याचाच विरोध आहे ?


अगं,त्याच्यासाठीच तर करतेस न उपवास ? त्याचा आयुष्य वाढवा,जन्मोजन्मी सात जन्मी हाच नवरा मिळावा हीच मागणी वडा कडेमागतो ना..!


सपना,अहो मावशी,आपण ज्या दोन कारणांसाठी हा उपवास करतो असं आपल्यला वाटते त्यातला अंतर्विरोध समजावून सांगितला त्याने मला.म्हणजे असं बघा,आपण नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभावं आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून हा उपवास करतो असं म्हणतो की नाही ? 


आता माझा नवरा म्हणतो आपल्याला दुसरा जन्मच असत नाही.जे काय जगायचं ते या एकाच जन्मात. नवरा बायको असू द्या नाहीतर इतर नाते.सर्व नात्यांतील प्रेम,जिव्हाळा,आपुलकी,राग,लोभ, भांडण सगळं याच जन्मात करायचं.या सृष्टीत कोणत्याच सजीवाला पुनर्जन्म नाही.पुनर्जन्माच्या या गोष्टींना विज्ञान मान्य करत नाही.


अग मावशी, क्षणभर पुनर्जन्म मान्य जरी केला तरी ही आपल्या उपवासातून ज्या दोन गोष्टी आपण मागतोय त्या एकाचवेळी पूर्ण होऊ शकत नाहीत.समजा हाच नवरा पुढच्या जन्मीही हवा असेल तर तो आणि आपण एकाच योनीत आणि तेही माणूस म्हणूनच जन्माला आलो पाहिजे.म्हणजे या जन्मात दोघेही माणूस आहोत म्हणून आमचे लग्न झाले. पुढच्या जन्मी दोघेही माणूस म्हणूनच जन्माला आलो पाहिजे.


 कारण तर कोणत्याही सजीवांची लग्नं होत नाहीत. आणि आपला धर्म तर म्हणतो चौऱ्यांशी लक्ष योनी फिरून झाल्यावर एकदा माणसाचा जन्म मिळतो. मग पुढचा जन्म आपण कोणता जीव असू? दोघंही एकाच जातीतील जीव असी का ? हे तर आपल्याला काहीच माहिती नाही.आणि दोघं वेगवेगळे प्राणी झालो तर ?


समजा आम्हा दोघांनाही पुढचा जन्म माणसाचा मिळाला तरीही आपल्याकडे साधारणतः नवरा हा वयाने मोठा असतो आणि बायको लहान. बरोबर की नाही ? मग पुढच्या जन्मी ही हाच नवरा मिळण्यासाठी पुढच्या जन्मी तो लवकर जन्माला आला पाहिजे. 


त्यासाठी या जन्मात त्याचा लवकर मृत्यू झाला पाहिजे.आपण या उपवासात तर त्याला आपल्यापेक्षा दीर्घ आयुष्य मागतो.तसं झालं तर आपला मृत्यू आधी होणार म्हणजे पुढच्या जन्मी आपण लवकर जन्माला येणार.अर्थात त्याच्या पेक्षा वयाने मोठ्या होणार.म्हणजे आपल्या लग्नाची शक्यता नाही. थोडक्यात काय एकतर त्याला दीर्घ आयुष्य मिळू शकतं किंवा तो पुढच्या जन्मी आपल्याला नवरा म्हणून मिळू शकतो.


आता मावशी चा चेहरा बदलला,खरंच गं  एवढे  वर्ष आम्ही उपवास करत आहोत खरं असा विचार कधी केला नाही.एवढ्यात आणखी एका काकू चा तावातावाने पुढे आली,ते काहीही रावू दे. तुझ्या नवऱ्याचं  विज्ञान झालं  पण श्रद्धा म्हणून काही असते की नाही ? सगळ्याच गोष्टी तुमच्या त्या कार्यकारण भावाने विचार करून थोडीच चालणार आहे.माणसाला जसा मेंदू आहे तसं मनही आहे.बुद्धी आहे तशा भावनाही आहेत.आणि श्रद्धा या भावनेचा विचार करतात बुद्धीचा नाही.


काही अंशी खरं आहे तुझं.पण एक लक्षात.मेंदू आणि मन वेगळे नाहीत.मन नावाचा कोणताही वेगळा अवयव आपल्या शरीरात नाही. तो मेंदूचाच एक भाग आहे.आणि श्रद्धा जपायला कुणी विरोध केलाय ? पण आपल्या श्रद्धा चुकीच्या समजावर आधारित आहेत हे लक्षात आल्यावर त्या बदलल्याही पाहिजेत.  


आपण बदलल्याची इतिहासात उदाहरणेही आहेत. जसं, पूर्वी नवरा मेल्यावर पत्नीने सती जायची प्रथा होती.पुढे राजाराम मोहन रॉय आणि काही इंग्रज अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून ती चुकीची प्रथा बदलली.सुरवातीला काही परंपरावाद्यांनी विरोध केला.पण आज ती अन्याय्य प्रथा नामशेष झाली आहे.



सपना ने  बोलायचं तर या मावशींना जेव्हा मासिक पाळी आली असेल तेव्हा मासिक पाळी हा शब्दही उच्चारला जात नव्हता.मासिक पाळीला त्या काळात विटाळ म्हंटले जात होते.अर्थात अजूनही काहीजणी म्हणतात ते थोडं बाजूला ठेऊ.पाळीच्या चार दिवसांत स्त्रिया बाहेर च्या खोलीत बसायच्या.स्वयंपाका शिवाय घरातील सर्व कामे करवून घेऊनही आपल्याच कुटुंबात त्यांना अस्पृश्यपणाची वागणूक दिली जायची. आज ही परिस्थिती बदलली आहे. 


आज स्वत:च्या आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेऊन स्त्रिया सर्वत्र मुक्तपणे वावरताना दिसतात. अर्थात देव आणि धार्मिक कामांबाबत आजही पाळीकडे विटाळ म्हणूनच पाहणाऱ्या अनेकजणी हेत. तरीही पाळीबाबतच्या पूर्वीच्या अनेक श्रद्धा या खरंतर अंधश्रद्धा होत्या हे आज सर्वमान्य झाले आहे. म्हणजेच आपण काळानुसार आपल्या श्रद्धा बदलतो.खरंतर त्यामुळेच धर्म प्रवाही राहतो. 


आणि म्हणूनच वटपौर्णिमे च्या व्रतातील अंधश्रद्धा आपण सोडून दिल्या पाहिजेत.आता या व्रताला आधुनिक विज्ञानाशी सुसंगत दाखवण्यासाठी काहीजण महिलांना ऑक्सिजन मिळणे, त्या निमित्ताने घर बाहेर पडण्याची संधी मिळणे सात जन्म म्हणजे चौऱ्यांशी वर्षे अशा किंवा यासारख्या काही गोष्टी जोडतात.पूर्वीच्या काळात अशी लटकी समर्थनं ठीक होती. आजच्या काळात स्त्री म्हणून आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर ती थेट करावी त्यासाठी कुण्या व्रतामागे लपण्याची काय गरज ?


 एक मैत्रीण शहरात राहते.त्यांच्याकडे कुठला आलाय वड ? त्या सरळ बाजारात जातात वडाची फांदी विकत आणतात.ती कुंडीत लावतात आणि त्यांच्या कॉलनीत ल्या बायका त्या फांदीभोवती फेऱ्या मारतात.” एक मैत्रीण तिचा अनुभव सांगू लागली. आता यांना काय म्हणावं ? यातली खेदाची गोष्ट म्हणजे शहरातल्या या जवळजवळ सर्व मैत्रिणी चांगल्या शिकलेल्या असतात.आता या शिक्षणाने खरंच शहाण्या झाल्या म्हणाव्यात काय ?

 

शिक्षणाने माणसाला लिहा वाचायला येते पण विचार करायला येईलच असं नाही.” विचार करू शकणाऱ्या एका मैत्रिणीने आपले परखड मत नोंदवले.अगदी सत्यवान आणि सावित्रीच्या मूळ गोष्टीकडे आजच्या संदर्भात पहायचं म्हंटलं तरीही यमाकडे " राज्य गेलेल्या " आणि "अंध असणाऱ्या " आपल्या सासऱ्याला " खुर्चीवर बसून नातवंडांचे तोंड पाहण्याचं सुख " लाभू देत’ असे एकाच वरात अनेक गोष्टी मागणारी सावित्री बुद्धिमानच म्हणायला हवी. तिच्या या बुद्धिमतेचं स्मरण करायचं म्हणून वडाला फेऱ्या मारून आपण आपल्या कोणत्या बुद्धिमतेचं दर्शन घडवतो ?आता तुझी एक एक गोष्ट आम्हाला पटायला लागली आहे. आम्ही तर असा कधी विचारच केला नाही. तरीही श्रद्धा म्हणून आम्हाला काही करायचं असेल तर ? 

वटपौर्णिमे निमित्त काहीतरी करणारच आहे. त्यासाठी काल आम्ही एक छान रोप आणलंय. आज आम्ही दोघं मिळून ते झाड लावणार आहोत. म्हणजे एका बाजूला अंधानुकरण न करता व्रत केल्याचा आनंद आणि दुसरीकडे पर्यावरणास हातभार लावल्याचे समाधान अगं खरं आहे तुझं. नाही तरी असे काही तरी सकारात्मक पर्याय दिल्याशिवाय समाजाच्या मानसिकतेत बदल होणार नाहीत. मीही आमच्या यांना आताच रोप आणायला पाठवते.यावर्षी एवढी तयारी केली आहे तर वडाला शेवटच्या फेऱ्या मारते आणि संध्याकाळी ह्यांच्यासोबत अंगणात छान रोप लावून त्या रोपासारखं आमचं प्रेम बहरावं अशी त्याच्याकडे प्रार्थना करते.


सपना च्या काही मैत्रिणींना तिचा बदलेला हा विचार पटलेला दिसला.तर काहीजणी तिला वेड्यात काढत एकमेकीशी पुटपुटतताना दिसल्या. त्या सर्वजणी हातातल्या ताटासह गावाबाहेर च्या वडाच्या दिशेने निघाल्या. 


सपना ने घेतलेला हा पुढाकार पाहून माझं ही मन भरून आलं. गेल्यावर्षी तिने केलेल्या वटपौर्णिमे च्या उपवासाचा उपहास न करता मी तिच्याशी संवाद केला होता.वर्षभर अधूनमधन या आणि अशा विषयांवर आमचे बोलणे व्हायचे. त्यातूनच यावर्षी तिने स्वतः यावर्षी परिवर्तन स्वीकारले होते.नुसतेच स्वाकारले नव्हते तर ते घडवून आणण्यासाठी ती कृतीशील पुढाकार घेत होती.

          सुरेश सुखदेव.कन्नमवार                लेखक तथा मुख्य संपादक - एस.के.24 तास   मु.कोंडेखल पो.केरोडा ता.सावली जि.चंद्रपूर     मो.नं : - 8805113505

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !