चिमूर तालुक्यातील खानगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाने घेतला बळी.

चिमूर तालुक्यातील खानगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाने घेतला बळी.


एस.के.24 तास


चिमुर : चिमूर तालुक्यातील खानगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. अंकुश खोब्रागडे वय,३३वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी बल्लारशाह वनपरिक्षेत्रात वाघाने एका इसमाचा बळी घेतला. जिल्ह्यातील ही लागोपाठ दुसरी घटना आहे.


ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खानगाव येथील अंकुश खोब्रागडे हा शेतकरी शेतात गुरेढोरे बांधून त्याच्या रखवालीसाठी जात होता. त्याचे शेत चिमूर - वरोरा या राज्य महामार्गाला लागून आहे.मंगळवारी रात्री अंकुश शेतावर गेला.


मात्र बुधवारी सकाळी घरी परत आला नाही. त्यामुळे लहान भाऊ सकाळी शेतावर गेला असता त्याला अंकूशचा मृतदेह दिसला.या घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी,किशोर देऊळकर यांना देण्यात आली. 


माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी दाखल झाले.मृत अंकुश याच्या शरीरावर वाघाच्या हल्ल्याच्या जखमा होत्या.वन विभागाने पंचनामा करून वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याचे सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !