अ-हेरनवरगाव ला पाणीपुरवठा करणा-या नळ योजनेचे काम बंद अवस्थेत.


अ-हेरनवरगाव ला पाणीपुरवठा करणा-या नळ योजनेचे काम बंद अवस्थेत.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी - दिनांक,०५/०३/२०२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथे जनावरांचे वाढलेले प्रमाण, वाढलेली लोकसंख्या आणि हर घर पाणी या योजनेअंतर्गत देण्यात आलेले नवीन नळ कनेक्शन यामुळे नळ योजनेद्वारे  येथील जनतेला होत असलेला पाणीपुरवठा हा दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

 नुकतिच उन्हाळ्याला सुरुवात आणि त्यामुळे भविष्यात होणा-या पाणी टंचाईचे  गांभीर्य लक्षात घेऊन गावात नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी भालेश्वर घाटावर वैनगंगा नदी पात्रात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे बांधकाम मागील दीड दोन वर्षापासून करून ठेवण्यात आलेआहे.

  सदर विहिरीचे बांधकाम हे अपूर्ण असून गावामध्ये पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे वैनगंगा नदीमध्ये बांधकाम करण्यातआलेल्या पाण्याच्या विहिरी ह्या फक्त शोभेच्या वस्तू ठरवून शासकीय योजनेचा पैसा वसूल करण्यासाठी नदीपात्रात पुतळे म्हणून उभे करण्यात आले आहेत काय अशी शंका गावकऱ्यांच्या मनात तयार होत आहे. 

अ-हेरनवरगाव ला सध्या गावांमध्येच बांधण्यात आलेल्या विहिरी मधून नळाद्वारे गावात पाणीपुरवठा होत आहे. सदर पाणीपुरवठा होत असताना उंच भागावर असलेल्या घरांना पाणी मिळत नसल्याची बोंब गावकरी,स्त्रिया करताना दिसून येत आहेत.

तरी वैनगंगा नदी पात्रातून नवीन बांधकाम करण्यात येणारे नळ योजनेचे काम हे लवकरात लवकर सुरू करून गावाला हर घर जल या योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्यासाठी बंद असलेले नळ योजनेचे काम हे जलद गतीने सुरू करावे अशी येथील जनतेची मागणी आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !