नक्षत्राचं देणं काव्यमंच चे जिल्हाध्यक्षपदी,कवयित्री रोहिणी मंगरूळकर यांची निवड.

नक्षत्राचं देणं काव्यमंच चे जिल्हाध्यक्षपदी,कवयित्री रोहिणी मंगरूळकर यांची निवड.


एस.के.24 तास


चंद्रपूर : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती, नक्षत्रांचं देणं काव्यमंच चंद्रपूर आणि झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर शाखेच्या वतीने  सरकार नगर येथे कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे च्या चंद्रपूर  जिल्हाध्यक्षपदी कवयित्री रोहिणी मंगरूळकर यांची निवड झाल्याबद्दल या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या एड.पारोमिता गोस्वामी यांच्या हस्ते मानवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर विशेष अतिथी म्हणून एड. कल्याण कुमार, जि.प.चे माजी उप कार्यकारी अधिकारी श्रीधर मालेकर,विजय सिध्दावार आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.

 

श्री,तुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन  केल्यानंतर  संकल्प गीत कार्तिक चरडे यांनी सादर केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रा.श्रावण बानासुरे यांनी केले. त्या काळात शासनाच्या आदर्श गाव  योजना संकल्प व प्रकल्प अभियानात गीताचार्य दादांनी दिलेले योगदान अविस्मरणीय होते, असे प्रतिपादन श्रीधर मालेकर यांनी केले . एड. कल्याणकुमार याप्रसंगी म्हणाले, राष्ट्रसंताच्या पावन प्रेरणेने कर्मयोगी श्रीतुकारामदादा यांनी अड्याळ टेकडीवर भूवैकुंठ उभे केले. 


त्या प्रयोगातून अनेक कार्यकर्ते घडले. श्रीसंत तुकारामदादा गीताचार्याच्या कार्य प्रेरणेतून आम्हाला दारूबंदीच्या अभियानात उर्जा मिळत होती.राष्ट्रसंताच्या परिवर्तनवादी गीतांमुळे महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यास बळ मिळत असे,असे मत एड.पारोमिता गोस्वामी यांनी मांडले.  ग्राम.बंडोपंत बोढेकर म्हणाले की, कर्मयोगी श्रीतुकारामदादा हे महान तपस्वी होते. त्यांनी आपल्या आत्मबळाच्या जोरावर  समाजमनात ग्रामगीता रूजविण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचे मत मांडले.


यावेळी झाडीबोली साहित्य मंडळाच्या सदस्य  कवयित्री श्रीमती रोहिणी मंगरूळकर, मंजूषा खानेकर, सरिता बेले,छाया टिकले, संगीता मालेकर,कु. गुंजन झाडे,कार्तिका कायरकर आदींनी स्वरचित कवितांचे वाचन केले.


या कार्यक्रमात  नशामुक्त भारत अभियानाच्या  जिल्हास्तरीय  समितीत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल श्रीधर मालेकर यांचा सत्कार करण्यात आला. संपादक प्रभाकर आवारी यांच्या   प्रभातगुंजन च्या वार्षिक विशेष साहित्य विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रभावी सूत्रसंचालन डॉ.धर्मा गांवडे यांनी केले.  


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलासराव उगे,देवराव कोंडेकर,अभय घटे,  नामदेव गेडकर, उमेश आष्टनकर , विजय चिताडे, खंगार पाटील,साहिल बुलबुले ,डी.टी. नन्नावरे, रजनी बोढेकर,देवराव बोबडे,अभिषेक बुलबुले, सुशिल आडे,राजु टोंगे आदींनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !