म.फुले चे कार्य पूढे नेणे काळाजी गरज आहे. - कान्हेकर सर.गडचिरोली

म.फुले चे कार्य पूढे नेणे काळाजी गरज आहे. - कान्हेकर सर.गडचिरोली 


एस.के.24 तास


गडचिरोली : बहुजनाच्या उद्धारासाठी म. फुले नी आपले आयुष्य घालविले.स्त्रीयांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला म्हणुनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेना गुरु मानले.म.फुले ची विचारधारा ज्या ओबिसींनी चालविली नाही ती विचारधारा डॉ.आंबेडकरानी चालविली.


अश्या प्रकारचे मोलाचे विचार भोजराज कान्हेकर यांनी म. फुले यांच्या स्मृतीदिनी कार्यक्रमांत मांडले.डॉ.आंबेडकर सामाजीक न्याय सहाय्यता केंद्र,गडचिरोली च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन सोहळा गांधी चौकात मोहन मोटघरे यांचा अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफ चे जिल्हाध्यक्ष कान्हेकर सर,रिपब्लिकन पार्टी चे जितहाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, प्रमोद राऊत आदि लाभले होते.


सुरवातीला प्रमुख पाहुण्यानी म.फुले, डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर,वनिता पदा,प्रमोद राऊत आनंद अलोणे,नरेश बांबोळे आदिनी म.ज्योतीबा फुले यांच्या जिवनावर विचार प्रगट केले.


 तर अध्यक्षीय भाषणात मोहन मोटघरे यांनी बहुजन समाजावर होणारे अन्याय अत्याचार जोपर्यत नष्ट होत नाही तोपर्यत म.फुले ची जयंती आपण साजरी करीत आहोत यांचे समाधान होणार नाही.कार्यक्रमाचे आयोजक नारायण मुनघाटे आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की शुद्र आणि अतिशुद्राना अनेक जाती व्यवस्थेत विभागण्यात आले.त्या जाती व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !