जरांगे-पाटलांचा बळी घेण्याचं कट-कारस्थान राज्यकर्त्यांच्या मनात आहे का ? - विनायक राऊत,खासदार(ठाकरे गट) ★ मराठा आणि धनगर आरक्षणाचं बिल मंजूर करून घ्यावे अशी मागणी विनायक राऊतांनी केली.

जरांगे-पाटलांचा बळी घेण्याचं कट-कारस्थान राज्यकर्त्यांच्या मनात आहे का ? - विनायक राऊत,खासदार(ठाकरे गट)


मराठा आणि धनगर आरक्षणाचं बिल मंजूर करून घ्यावे  अशी मागणी विनायक राऊतांनी केली.


एस.के.24 तास


मुंबई : सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा सहावा दिवस आहे. जरांगे-पाटलांनी अन्नपाण्याच्या त्याग केला आहे. त्यामुळे जरांगे-पाटलांची प्रकृती खालावली आहे.यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

“ जरांगे-पाटलांचा बळी घेण्याचं कट-कारस्थान राज्यकर्त्यांच्या मनात आहे का ? मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं लोकसभेचं अधिवेशन बोलवावं ” अशी मागणी विनायक राऊतांनी केली.ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.


विनायक राऊत म्हणाले, “ मिंधे सरकार कपटी वृत्तीचं आहे. सरकार जरांगे-पाटलांच्या जीवाशी खेळतंय. सरकारबरोबर चर्चेस तयार असल्याचं जरांगे-पाटलांनी सांगितलं. पण, सरकारच्या दलालांनी जरांगे-पाटलांची दखल घेतली नाही. ”


रविवारी एका दिवसांत चार मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत. जरांगे-पाटलांचा बळी घेण्याचं कट-कारस्थान राज्यकर्त्यांच्या मनात आहे का ? अशी शंका निर्माण झाली आहे. जरांगे-पाटलांच्या पाठिशी उद्धव ठाकरे,शरद पवार आणि आम्ही उभे आहोत.पंतप्रधान मोदींनी लोकसभेचं तातडीचं विशेष अधिवेशन बोलवावं. मराठा आणि धनगर आरक्षणाचं बिल मंजूर करून घ्यावे ” अशी मागणी विनायक राऊतांनी केली.


सरकारला बळी घ्यायचा तर घेऊ द्या : - अंतरवाली सराटी येथे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमले आहेत. आंदोलकांनी जरांगे-पाटलांना पाणी पिण्याचं आवाहन केलं. त्यावर “ पाणी पिले तर आरक्षण कसं भेटणार ? सरकारला एखादा बळी घ्यायचा तर घेऊ द्या ” असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !