निसर्ग कवितांनी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल उत्साहात संपन्न.

निसर्ग कवितांनी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल उत्साहात संपन्न.


एस.के.24 तास


पुणे : नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय भोसरी,पुणे च्या वतीने दरवर्षी प्रमाणे वर्षीही राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व  काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण आणि दिवाळी अंक स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. सदर कार्यक्रम  सायन्स पार् ,चिंचवड येथे  संपन्न झाला. यावेळी या   निसर्ग व श्रावण विषयावरील कविता सादर करुन काव्यमैफलीत रंग भरला. संपूर्ण महाराष्टातून या  काव्यमैफलीसाठी  कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सहभागींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या उद्घाटन कवयित्री सौ.वृषाली टाकळे (रत्नागिरी), कार्यक्रमाच्या अध्यक्षा कवयित्री शिक्षणतज्ञ डाॅ.सौ.अलका नाईक (मुंबई)उपस्थित  होते. 


डाॅ.शांताराम कारंडे(मुंबई),उद्योजक श्री वसंत टाकळे (रत्नागिरी),  प्रदीपदादा वाल्हेकर,रोटरी प्रेसिडेंट सुधीर मरळ,रामेश्वर पवार,निलेश सोनवणे, गोविंद जगदाळे,जयसिंग वाळूंज,सायकलपट्टू  दत्ता घुले, समाजसेवी अण्णा जोगदंड,महमंद मुलाणी,संगीता जोगदंड,धनंजय पाटील,डाॅ.लक्ष्मण हेबांडे,राजेश साबळे,भरत बारी,बबन चव्हाण,प्रा.दिलीप गोरे,अनंत देशपांडे,अनिल वडघुले इ.मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.सौ.वृषाली टाकळे यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचे  उदघाटन झाले.


यावेळी त्या म्हणाल्या,"नक्षञाचं देणं काव्यमंच हा कवींना सन्मान देणारे खरेखुरे व्यासपीठ असून गेली २४ वर्षे संस्थेने काव्य क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास पात्र आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी ही क्रियाशील संस्था आहे.कविता हा कविचा आत्मा असतो, असेही त्या म्हणाल्या.


सौ.डाॅ.अलका नाईक म्हणाल्या,"कविता निर्मिती म्हणजे भावनांचा उद्रेक,संवेदनशील मनाचे चिंतनशील विचारांचे प्रगटीकरण आहे.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नक्षत्रांचे देणं काव्यमंच चे अध्यक्ष प्रा.राजेंद्र  सोनवणे यांनी केले.


राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेत आलेल्या २६९ कवितांचा सहभाग त्यातून प्रथम क्रमांक- रामदास अवचर(अहमदनगर),व्दितीय क्रमांक-नवनाथ पोफळे-(बीड),तृतीय क्रमांक  सौ.सुलभा चव्हाण (मुंबई)यांनी पटकावला.त्यांना स्मृतीचिन्ह,सन्मानपञ देऊन सन्मानित  करण्यात आले.      राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा घेण्यात आली.यात प्रथम क्रमांक-वारसा अहमदनगर,व्दितीय क्रमांक-कलासागर पिंपरी,तृतीय क्रमांक-गंधाली मुंबई यांनी पटकवला.यांना स्मृतीचिन्ह,सन्मानपञ  देऊन गौरविण्यात आले.


सूत्रसंचालन  सुरेश साळुंके,सौ,प्रीती सोनवणे यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनिल बिराजदार यांनी केले.सलग सहा तास ही काव्य मैफल रंगली.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


या कार्यक्रमाच्या संयोजनात रोटरी क्लब  वाल्हेकरवाडी.कै.भागुजीशेठ किर मंडळ,वसंत टाकळे तसेच मोहन कुदळे,विनायक विधाटे,डाॅ.गिरीष सपकाळ,रामदास हिॅगे,सुभाष वाल्हेकर,सौ.दिव्या भोसले,अमोल देशपांडे,भाऊसाहेब आढाव,प्रशांत निकम,साईराजे सोनवणे,प्रकाश दळवी,संतोष देशमुख इ.सहभाग घेतला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !