अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,०३/०२/२३" कोरोनाच्या प्रादुर्भावाचा जास्त फटका शिक्षणव्यवस्थेला बसला.अध्यापन,अध्ययन,परीक्षापध्दती बदलली.पुस्तकावर जगण्यापेक्षा मोबाईलला विद्यार्थी महत्व देऊ लागले,पण पुस्तकातून ज्ञान मिळते अन् मोबाईलमधून माहिती हे आपण समजून घ्या. विद्यार्थी विवेकी असावा.आत्मविश्वास, जिद्द,एकाग्रता निर्माण करणे काळाची गरज आहे.हे आम्ही आमच्या काळात केलेत, त्यामुळे नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडलेत आणि या महाविद्यालयाला मोठे केले. " असे मार्मिक विवेचन अर्जुनी (मोर) येथील एस एस जायस्वाल महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी केले.
यानंतर शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती वितरण समारंभ पार पडला.यात प्राध्यापक व संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपञ,स्मृतीचिन्ह व रोख राशी देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठातून उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविलेली प्रियंका दिघोरे व नवलाखे अवार्डप्राप्त प्राची इनकणे, गुणवंत प्राध्यापकांचा विशेष सत्कार केल्या गेला.
प्रास्ताविक, परिचय प्राचार्य डॉ डी एच गहाणे,संचालन प्रभारी प्रा,आकाश मेश्राम,पुरस्कार वितरण सोहळ्याचे संचालन प्रा बालाजी दमकोंडवार,प्रा दलेश परशुरामकर,प्रा वर्षा चंदनशिवे, प्रा अजय खोब्रागडे,डॉ एम डी दुपारेंनी केले तर आभार डॉ युवराज मेश्रामांनी मानले.यशस्वीतेसाठी डॉ,सुभाष शेकोकर,डाॅ राजेंद्र डांगे,डाॅ तात्याजी गेडाम,डाॅ रेखा मेश्राम,डाॅ असलम शेख,डॉ धनराज खानोरकर,डॉ मोहन कापगते, डॉ किशोर नाकतोडे,डॉ योगेश ठावरी,डाॅ अरविंद मुंगोले,प्रा मिलिंद पठाडे,डॉ,ऐ एन येरपुडे,डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे,प्रा रुपेश वाकोडीकर,डॉ भास्कर लेनगुरे, प्रा निलिमा रंगारी इ. समिती प्रभारींनी व समिती सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.