सामाजिक कार्यकर्ते,प्रफुल निरूडवार यांची पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावातील नागरिकांना तहसीलदारांकडून अतिक्रमण संदर्भात नोटीस देण्यात आले असून दि. 22/11/2022 पर्यंत अतिक्रमणधारकांनी अतिक्रम न हटवल्यास कारवाई करण्यात येईल असे संबंधित नोटीसमध्ये नमूद असल्याने संपूर्ण गावकरी धास्तावले असून गावात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवून नये याकरिता सामाजिक युवा कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी आज दि.24/11/2022 ला मा.नरेंद्रजी मोदी साहेब (पंतप्रधान भारत सरकार),मा.एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य),मा. विनयजी गौडा साहेब (जिल्हाधिकारी चंद्रपूर) यांना पत्र पाठवलेलं आहे.