मागिल 4 वर्षा पासून ची रखडलेली जिल्हा परिषद ची पदभरती तत्काळ सुरु करण्याबाबत मा.सुप्रियाताई सुळे यांना निवेदन.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्हा परिषद मधील विविध पदासाठी 3 मार्च 2022 रोजी 13521 पदासाठी जाहिरात ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत जाहिरात देण्यात आली होती.राज्य भरातून जवळ पास 12 लाख 72 हजार 329 उमेदवारांनी या पदाच्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे.विविध कारणामुळे मागील 4 वर्षा पासून परीक्षा होऊ न शकल्या मुळे उमेदवारामध्ये नैराश्य कडे जाऊन काही उमेदवार मानसिक चिंतेत गेलेले आहेत.
मात्र आता ग्राम विकास विभागाने शासन निर्णय दिनांक 10 मे 2022 ला रोजी प्रसिद्ध करून सदर भरती सुरु करण्याचे प्रत्येक जिल्हा परिषद यांना आदेश दिले आहे. परंतु 27 दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा कोणत्याच जिल्हा परिषद ने या पदभरती संदर्भात कार्यवाही सुरु केलेली नाही. 10 मे 2022 चा शासन निर्णय तसाचा धुळ खात ठेवण्यात आले आहे.
असे निवेदन सुनिल तागडे,नरेश इंदूरकर,वैभव कोटागले, वसंत डेब्बा यांनी दिलेल्या निवेदन मध्ये म्हटले आहे.