सावली च्या विद्यालयामार्फत विद्यार्थी शोध मोहीम युद्ध स्तरावर.

सावली च्या विद्यालयामार्फत विद्यार्थी शोध मोहीम युद्ध स्तरावर.


एस.के.24 तास (लोकमत दुधे)


 सावली : तालुक्यातील शाळा ; विद्यालयाच्या उन्हाळी सत्राचे निकाल नुकतेच घोषित झाले असल्याने सावली येथील रमाबाई आबेडकर आणि विश्वशांति विद्यालय या दोन्ही शाळेच्या माध्यमातुन इयत्ता वर्ग  ५ ते  वर्ग ८ विसाठी विद्यार्थी खेचो अभियान शिक्षकानी संस्थेच्या व्यवस्थापनाच्या आदेशानुसार युद्धस्थरावर सुरु केलि असल्याचे वृत आहे दिवसागनिक शाळाची वाढलेली संख्या त्यातही इग्रजी कान्वेन्ट आदिमुळे वर्ग ५ ते वर्ग ८ साठी येणा ऱ्या विद्याथ्याच्या संखेत दिवसेनदिवस घट होत असल्याने विद्यालयाचे वर्ग कमी होण्याचा धोका वाढत चालला आहे या भितिने शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक या घसरत चाललेल्या संखेने काळजीत पडले असून यावर रामबाण उपाय म्हणून  विद्यार्थी शोध मोहिम  येथील रमाबाई आणि विशवशांति  विद्यालयाच्या शिक्षकानी तालुक्यातील लगत असलेल्या गावात  युद्धस्थरावर राबविने सुरु केले आहे विद्यार्थी  मिळविन्याच्या स्पर्धेसाठी शिक्षकांकडुन पालक तसेच विद्यार्थाना आमिषे दाखवून टि सी हस्तगत केलि जात असल्याचे कळते विद्यार्थी खेचो मोहिम यशस्वी करण्या करीत एकेका शिक्षकावर  विद्यार्थी  संख्या  शाळेच्या व्यवस्थापनाने ठरवून दिली आहे ती संख्या  पुर्ण करण्या करीत शिक्षक आपल्या प्रयत्नाचा आटापिटा करने सुरु केले आहे ही मोहिम तालुक्यातील चकपिरजी खेड़ी उसेगाव चारगांव घोडेवाही बोथली आदि गाव खेड़यात मोठ्या प्रमाणात राबविली जात असल्याचे दिसत आहे येथील दोन्ही विद्यालयात पाचव्या आणि आठव्या वर्गाकरित विद्यार्थी आपल्याकड़े यावे याकरीता  चवथा व सातवा वर्ग उतीर्ण विद्यार्थाची शोध मोहिम विद्यालयाच्या वतीने शिक्षकामार्फत राबविली जात आहे ही विद्यार्थी शोध मोहिम आता स्पर्धेचे स्वरूप धारण केल्याने पाचव्या व आठव्या वर्गाकरिता कुठूनही कसेही करुण विद्यार्थी आनाच अश्या दबावतंत्राचा वापर येथील शाळा व्यावस्थापनाने सम्बंधिता शिक्षकावर करने सुरु केले आहे चवथा आणि सातवा वर्ग पास झालेले या वर्षाचे विद्यार्थी  कोणते याचा पत्ता लाऊन रखरखत्या उन्हात थेट शिक्षक त्याच्या पालकाना गाठून आमचे विद्यालय कसे  छान आहे आपल्या पल्याचे शेक्षणिक भविष्य आमच्याकडे कसे सुरक्षित राहणार आहे हे पटवून टी सी हस्तगत करुण विद्यार्थ्या ना जाळयात ओढ़ने सुरु केले आहे नुकताच चवथ्या वर्गाचा निकाल  लागला निकालाच्या वेळेला प्राथमिक शाळानच्या दारावर कुणी विद्यार्थी गवसनार क़ाय  या प्रयत्ननात विद्यालयाचे शि क्षक उभे राहत असल्याचे दिसुन आले ज्या विद्यालयाचा निकाल चांगला लागत आलेला आहे त्या नामांकित विद्या लयाच्या शिक्षकाना विद्यार्थी आनन्याकरिता फ़ारसे परिश्रम करावे लागत नाही मात्र ज्या विद्यालयाचा निकाल सतत वाईट आहे त्या विद्यालयातिल शिक्षकाना  मात्र विद्यार्थी फासात गोवन्याकरिता प्रयत्नाची शिकस्त करावी लागत आहे काही शिक्षकानी-विद्यालयानी तर पालकाना प्रलोभन दाखविने सुरु केले आहे तर काही शिक्षकानी आपल्या शाळेचा गणवेष आणि पाचव्या व आठव्या वर्गाची पाठयपुस्तके उतीर्ण झालेल्या विद्याथ्याना देण्याचे आमिषे देवून टी सी जबरीने मागने असले प्रकार होत असून त्याकारिता प्रसंगी शिक्षकामधे भांडनेही  उदभवण्याची शक्यता वर्तविली जात आहे पूर्वी केवळ  प्राथमिक शाळा असना ऱ्या शैक्षनिक सस्थानी आपल्या शाळामधे पाचव्या - सातव्या आता मान्यता घेतली असल्याने चवथा वर्ग उतीर्ण झालेल्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना ते  इतरत्र जावू देत नाहीत टी सी देत नाहीत त्यामुळे पालक  व मुख्यध्यापकामधे ही भांडने ही होन्याची शक्यता आहे नकारता येत नाही त्यामुळे पाचव्या व आठव्या वर्गाचा विद्यार्थी शोधून त्याला आपल्या शाळेत आनने ही शिक्षकांकरीता मोठी कठिन कामगिरी होऊन बसली आहे वर्ग कमी झाले तर आपली नोकरी उद्या धोक्यात येणार या चितेतुन विद्यार्थी शोधो अभियानात सर्वच विद्यालयाचे शिक्षक सामिल होऊन विद्यार्थी जमा करण्याच्या प्रयत्न केला जात आहे मराठी माध्यमातील पाचव्या - आठव्या वर्गा करीता विद्यार्थी ढुढो अभियानात गुणतलेल्या अनेक शिक्षकाची मूल मात्र इग्रजी माध्यमातील शाळामधे शिकत आहेत अशा शिक्ष कानी तुमचेही मूल मग मराठी माध्यमात का घालीत  नाहीत  आमच्या मुलाच्या मागे का लागतात असे खोचक प्रश्न कुण्या पालकाने केला तर हे शिक्षक त्याना क़ाय उत्तर देणार सध्या हेच चित्र तालुक्यातील लाहनमोठ्या गाव खेडयातुन बघायला मिळत आहे त्यामुळे या विद्यार्थी शोध मोहिमेत विद्यार्थी कसेही करुण आणण्यासाठी शिक्षकावर होत असलेल्या बळजबरीने शिक्षक वर्ग मानसिक दबावात वावरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !