मारोडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या.

 

मारोडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या.


एस.के.24 तास 


मुल : सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी मुळे आणि अतिक्रमण केलेल्या जमिनीवर वनविभागाने  कब्जा केल्याने मारोडा येथील एका शेतकऱ्यांनी निराश होऊन स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 5.वा. दरम्यान घडली.नामदेव भद्ररुजी मानकर वय,65 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहेत,शेती करून आपली उपजीविका करीत असतात.मात्र या वर्षी अनेक शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणे पाहिजे धान पिकाचे उत्पन्न झालेले नाही.म्हणून कंटाळून आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर शेतकऱ्यांची मारोडा शेत शिवारात 1 एकर शेती आहे या सोबत मागील अनेक वर्षांपूर्वी शेतीला लागून असलेल्या वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून शेती करत होता.मात्र काही दिवसांपूर्वी वनविभागाने शेतीचे अतिक्रमण काडून कब्जात घेतल्याने ते नेहमी चिंताग्रस्त असत अशी चर्चा सुरू आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !