विवेकानंद विद्याभवन अड्याळ जिल्हा भंडारा च्या माजी विद्यार्थ्यांचा ईयत्ता पाचवी ते दहावी (सन 1982 ते 1988 बॅचचा) प्रथमच ऑनलाईन स्नेहमिलन सोहळा संपन्न.

विवेकानंद विद्याभवन अड्याळ जिल्हा भंडारा च्या माजी विद्यार्थ्यांचा ईयत्ता पाचवी ते दहावी (सन 1982 ते 1988 बॅचचा) प्रथमच ऑनलाईन स्नेहमिलन सोहळा संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : विवेकानंद विद्याभवन अड्याळच्या माजी विद्यार्थ्यांचा  ईयत्ता पाचवी ते दहावी (सन 1982 ते 1988 बॅचचा) स्नेहमिलन सोहळा शाळेच्या आवारातच दि.१६/०१/२२ रोजी घेण्याचे योजिले होते परंतु कोविड शासकीय निर्बंध असल्यामुळे प्रथमच हा स्नेहमिलनाचा सोहळा ऑनलाइन पद्धतीने *ठरलेल्या दिवशीच* दि. १६/०१/२२ रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. या कार्यक्रमात बरोबर शिकत असलेले दिवंगत विद्यार्थी आणि दिवंगत शिक्षक ह्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.



स्नेहमिलनाचे उद्घाटन करतांना डॉ.भूमेंद्र भोंगाडे, प्राध्यापक व प्रमुख pharmaceutical chemistry, RAK विद्यापीठ, U.A.E. म्हणाले की गरजु मित्रांना आणि त्यांच्या मुलांना विविध प्रकारे मदत करून हा ग्रुप अधिक कसा अर्थपुर्ण बनविता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. अध्यक्षपदावरून बोलतांना ESIC वैद्यकीय  पदव्युत्तर शिक्षण संस्था मुंबईचे Microbiology विभागाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. पवन उके म्हणाले आपण आपल्या जीवनाची half century गाठलेली आहे आणि बहुतेकांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत तेव्हा येणारे जीवन अधिक सुखकर कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे, प्रत्येकाने निस्वार्थ भावनेने, शालेय जीवनासारखे निरागस मनाने जगावे.ते पुढे म्हणाले की विवेकानंद विद्यालय अड्याळच्या इतिहासात आजपर्यंत कुठल्याही माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेतलेला नाही तेव्हा कोविडची तिसरी लाट ओसरताच शासकीय नियम पाळून शाळेतच आपण स्नेहमिलन सोहळा *साजरा करण्याची व्यवस्था करावी.तसेच प्रत्येकाने कोविड प्रतिबंधासाठी SMS (sanitizer, mask and social distancing) लक्षात ठेवावे.

प्रास्ताविकात नारायण जूवार ह्यांनी स्नेहमिलनाचे महत्त्व विशद केले.ह्यावेळी उपाध्यक्ष किशोर सायगण, प्रमुख पाहुणे संगीता पोटवार- चल्लावार व सीमा लाडे-  साखरे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. सुनंदा टेंभुर्णे - राऊत ह्यांनी आपल्या मधुर आवाजाने संचालन केले आणि सैंग कोहपरे ह्यांनी आभार प्रदर्शन केले.


दुसऱ्या सत्रात सर्वांच्या परिचयाचा कार्यक्रम शालेय दाखल खारीज रजिस्टर नुसार* सैंग कोहपरे  ह्यांनी घेतला. ह्यामध्ये   प्रत्येकाने दहावी नंतर च्या आयुष्यातील ३३ वर्षाच्या महत्वाच्या घटनांविषयी आणि त्याच्या उन्नतीविषयी माहिती दिली. सर्वांच्या चेहऱ्यावर तीन दशकांनंतर भेटल्याचा आनंद अमर्याद होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैंग, किशोर, सीमा, सुनंदा, नारायण,संगीता, संजय, माया ह्यांनी अथक परिश्रम घेतले.


कार्यक्रमाला प्रामुख्याने उमेश टेभुंर्णे,प्रशांत बोदेले,संजय ब्राम्हणकर, मोहन आराध्य,देवानंद शिंगाडे,बबन ढवळे, माया शिवनकर,मिना वाडेकर, मंदा शहारे,सौंद्रा ढवळे ,पुस्तकला शिंगाडे,वंदना गंधे,हे सर्व मित्र मैत्रिनीआवर्जुन उपस्थित  होते. कार्यक्रमाची सांगता सर्वांचेआभार व्यक्त करून करण्यात आली.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !